श्री गणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ

डॉ. सदाशिव गजानन देव

जून महिना सुरू झाला की गणपती उत्सवाच्या बातम्या वृत्तपत्रांतून झळकू लागतात. उत्सव मंडळांना जाग येते. नव्या कार्यक"मांच्या चर्चा सुरू होतात. उत्सवाचे वातावरण घराघरांतून जाणवायला लागते. मग उत्सवाकडे प्रवास करणारे दिवस कृतिशील बनायला लागतात. संपूर्ण देशभर ही लगबग जाणवते. गणपतीचा उत्सव म्हणजे वार्षिक लोकोत्सवच! तो अहमहमिकेने गाजवला नाही तरच नवल!
गणपती हा विघ्नहर्ता असल्याने प्रत्येक शुभकार्याच्या सुरूवातीला त्याचे पूजन होते. "विघ्नानि नाशयायान्तु सर्वाणि सुरनायक' अशी प्रार्थना करण्याची प्रथा हजारो वर्षे सुरू आहे. एकदा शुभकार्य यशस्वीपणे पार पडले की मन समाधानाने फुलून जाते. आता या कोटीसुर्यसमप्रभ महाकायाचे विधिवत विसर्जन करणे एवढेच शि"ुक असते. तेही वाजतगाजत. "जे जे निर्माण होते ते ते वाढत जाते आणि उचित कालानंतर ते नष्ट होते' हा सृष्टीचा नियम सर्वांच्या अनुभवाचा आहेच! मग गणपतीही या नियमाला अपवाद कसा असेल?

गणेश देवतेचे ऐतिहासिक स्वरूप


गणपती देवता हजारो वर्षे पूजनीय मानली जाते आहे. या घटनेला फार मोठा इतिहास लाभला आहे. प्रतिवर्षी या इतिहासाची एक आवृत्ती करावीच लागते, कारण नवीन घडणारी पिढी पुढील काळात ही जबाबदारी पेलणार असते. आपण राहतो त्या विश्र्वाची निर्मिती झाली त्यावेळी प्रचंड स्फोट झाला. हा आवाज "ॐ' या उच्चारणासारखा होता असे म्हटले जाते. "ॐ' हा ओंकार म्हणजेच महागणपतीचे नादस्वरूप होय. म्हणूनच गणपतीचे एक नाव "ओंकार' आहे. याचा अर्थ विश्वाच्या निर्मितीचे आदितत्व गणेशाच्या अस्तित्वाशी असे जोडले गेले आहे. भारतीय प्राचीन साहित्यात गणेशासंबंधी पाचव्या शतकापासून उ"ेख सापडतात. त्यापूर्वीच्या साहित्यात मात्र गणपतीचा उ"ेख सापडत नाही. गणपती हा शिव-पार्वतीचा पुत्र, त्यामुळे त्याचा उ"ेख साहित्यात वेदकाळापासून का झालेला नाही, याचा शोध विचारवंतांनी घेतला आहे. आधुनिक शास्त्रज्ञांनी मांडलेल्या मतांना छेद देऊन सनातनी पंडितांनी गणेश देवता "वैदिक देवता' असल्याचे सिद्ध केले. यासाठी पंडितांनी "गणपत्यर्थवशीर्ष' या उपनिषदाचा आधार दिला. या उपनिषदात गणपती देवतेचे संपूर्ण वर्णन व स्वरूप यांचा ऊहापोह केला आहे. अथर्ववेदाचा हा भाग आहे. तसेच ऋग्वेदातील "ब"ह्मणस्पती सूत्र' हे गणपतीचेच सूत्र आहे. वैदिक वाङ्मयातील "ऋग्वेद' हा आदिग"ंथ आहे. "ब"ह्मणस्पती' ही एक वैदिक देवता आहे. ही देवताच गणपतीचा पूर्वावतार आहे असे मानले जाते. ब"ह्मणस्पतीच्या हातात सुवर्णपरशु आहे, तसेच या वेदोक्त देवतेचे प्रथम पूजन केले जाते. खाली दिलेल्या मंत्रात गणपती आणि ब"ह्मणस्पद या देवतांचा उ"ेख सहज लक्षात येतोः
गणानाम् त्वा गणपतिं हवामहे । कविं कविनामुपमश्रवस्तमम।
ज्येष्ठ राजं ब"ाह्मणां ब"ह्मस्पत। आ न: शृण्वन्नुतिथि: सीद सादनम्।। (ऋग्वेद 2. 23. 1)
एकूण गणपती या देवतेबद्दल भाष्यकारांनी विपुल साहित्य निर्माण केले आहे.

श्री गणेशाचे आध्यात्मिक स्वरूप

गणेश देवतेचे ऐतिहासिक स्वरूप वर दिलेले आहे. आता या देवतेचे आध्यात्मिक स्वरूपही लक्षात घेण्यासारखे आहे. "गणपत्यर्थवशीर्षा'त या आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन केले आहे, ते असे.
""हे गणेशा, तू तत्व आहेस. तू प्रत्यक्ष ब"ह्म आहेस. तू आत्मा आहेस. तू ज्ञानमय, विज्ञानमय आहेस. तू सर्व काही आहेस''.
वाड्:मयाच्या अंतरंगात गणेशाचे अस्तित्व लक्षात येते, तर हीच गणेशाची उपस्थिती नादब"ह्मातही अनुभवता येते. तसेच गणेशोपासना प्रणयोपासनातूनही साध्य होते. अंतत: ही उपासना साक्षात ब"ह्मविद्याच आहे. मुद्गलपुराणात गणपतीचे असे व्यापक वर्णन केले आहे. ज्या मूलाधार चक"ात गणपतीचे अस्तित्व सतत असते ते चक" आणि तेथील कमळ लाल रंगाचे आहे म्हणून या देवतेला रक्तपुष्प, रक्तवस्त्र आणि रक्तचंदन यांची आवड आहे. गणेशाच्या पूजनात रक्तवर्ण असा विपुलतेने योजलेला आहे. गणेशाची अशी विविध वर्णने साहित्यात अनेक ठिकाणी वाचायला मिळतात.

गणेशाचे समाज स्वरूप

गणपती नावाप्रमाणेच गणनायक आहे. तो समाजातील सर्व लोकांना आपलाच वाटतो. त्यात गरीब आणि श्रीमंत असा भेद नाही. सर्वच माणसांना जीवनात संकटांचा सामना करावा लागतो, लहान मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. श्री गणेश देवतेवर पूर्ण श्रद्धा ठेवून जीवनप्रवास करीत असताना आपली श्रद्धा आणखी बळकट व्हावी, ती सामर्थ्यवान असावी यासाठी गणेशभक्त सदा तत्पर असतात. गणपती देवता संकटात मार्गदर्शन करते व त्यातून निभावून नेते अशी मनोमन खात्री भक्तांना वाटते. भक्ताला जसा गणेशभक्तीचा प्रत्यय येतो तसाच संस्था चालकांनाही येतो. कोणत्याही कार्याला सुरूवात करताना गणपतीचे पूजन केले जाते. घरभरणी, लग्न, मुंज यासारखी शुभकार्ये या श्रद्धेच्या बळावरच यशस्वी होतात. नाटक सुरू होताना नांदी म्हटली जाते तर तमाशाची सुरूवात गण गायनाने होते. असे हे गणेशाचे समाजस्वरूप होय.

अथर्वशीर्ष म्हणजे काय?

गणपतीच्या अनेक आरत्या, मंत्र, स्त्रोत्रे, शीर्षे, आळवण्या, श्र्लोक, ओव्या, आर्या, भूपाळ्या असे नाना प्रकार योजून गणेशभक्ती व्यक्त होत जाते. जातीनुसार, प्रदेशानुसार, वयानुसार, जीवनशैलीनुसार भक्तीचे विविध प्रकार आपण ऐकत असतो. या सर्व विविधतेचा उच्चार व संचय तयार करायचा तर मोठा कोशग"ंथ लिहावा लागेल. या लेखात फक्त अथर्ववेदात समाविष्ट असलेला "गणपत्यर्थवशीर्ष' हा मंत्र विचारात घेण्यात आला आहे. हा मंत्र संस्कृत भाषेत असला तरी तो सुलभ आणि सोप्या भाषेत लिहिला आहे. त्यामुळे त्याचा अर्थ सहज लक्षात येतो. उपनिषद वाङ्मय वेदांगांचा एक उपभाग आहे. "गणपत्यर्थवशीर्ष' हा मंत्र आहे. उपनिषद आणि शीर्षांत भेद आहे. शीर्षांना पाठांतरानंतर फलश्रुती सांगितलेली असते. उपनिषदांना फलश्रुती सांगितलेली नसते. शीर्षे फक्त अथर्ववेदाची असतात. अशा गणपत्यर्थवशीर्षाचे पुन:चरण 21 वेळा, 108 वेळा व याग आरंभला असेल तर 1000 वेळा करतात.

पंचोपचार व षोडशोपचार पूजा

आपल्या भारतीय संस्कृतीत दोन प्रकारच्या पूजापध्दती सांगितल्या आहेत. त्यांना दैनंदिन व प्रासंगिक पूजा म्हणतात. या प्रकारांना पंचोपचार, षोडशोपचार पूजा असेही म्हणतात. पंचोपचार पूजेत गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य (5) यांचा समावेश असतो तर षोडशोपचार पूजेत आवाहन, आसन, पाद्य, अर्ध्य, आचमन, स्नान, वस्त्र, उपवस्त्र, विलेपन, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प या 16 घटकांचा समावेश असतो. गणेश चतुर्थीची पूजा प्रासंगिक असते, त्यामुळे ती षोडशोपचार करावी लागते. या दिवशी व दर संकष्टी चतुर्थीला गणपत्यर्थवशीर्ष या मंत्राची आवर्तने करतात. या मंत्राचा उच्चार व त्याचा रूपांतरित अर्थ पुढे दिला आहे. शब्दश: अर्थ काहीसा कंटाळवाणा होईल. आपण जो मंत्र म्हणतो त्याचा अर्थ जर माहीत असेल तर आपली देवतेसंबंधी असणारी भावना आणि भक्ती दृढ होत जाते. या मंत्राचे एकूण तीन विभाग आहेत.

अथर्वशीर्षाचे तीन विभाग

1) प्रारंभिक प्रार्थना : ही प्रार्थना आवर्तनाच्या सुरूवातीला तसेच शेवटी म्हणतात. 2) पुन:चरण किंवा आवर्तन : "ॐ नमस्ते गणपतये' पासून "श्री वरदमूर्तयेनम:' येथपर्यंत म्हणतात. हा आवर्तनाचा मु"य भाग होय. हा भाग एकूण दहा ऋचांमध्ये विभागला आहे.
3) फलश्रुती : हा तिसरा विभाग आहे. गणपती अथर्वशीर्षाची आवर्तने केली तर भक्तांना काय फळ मिळते ते या भागात दिले आहे.
"गणपती अथर्वशीर्ष' वेदकाळापासून भक्तिभावाने म्हटले जाते तसेच फार मोठ्या भूभागावर उपयोजित आहे. त्यामुळे या मंत्राच्या उच्चारणात काही पाठभेद आढळतात. प्राथमिक स्वरूपाच्या या लेखात अशा त्रुटी सविस्तरपणे देण्याचे योजले नाही.
गणपती अथर्वशीर्ष हा खरे तर अथर्ववेदाचा एक उपभाग आहे. पण या मंत्राची प्रारंभिक प्रार्थना मात्र ऋग्वेदातील आहे. ऋग्वेदाचे लेखन अथर्ववेदाच्या बरेच अगोदरचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. ऋग्वेदाचे लेखन इ.स. पूर्व चार ते सहा हजार वर्षांचे आहे असे तज्ज्ञ मानतात. त्यामुळे या साहित्यात असलेली संस्कृत भाषा खूपच कठीण (आजच्या संदर्भात) असल्याचे मानले जाते. इ.स. पूर्व 5 व्या शतकात थोर वैय्याकरणी पाणिनी होऊन गेला. त्याच्यानंतर संस्कृत वाङ्मयात ललित साहित्याची सुरूवात झाली. शाकुंतल, मेघदूत, बाणभट्टाची कादंबरी अशी ललित काव्ये, नाटके, कादंबऱ्यांचे लेखन पाणिनीच्या उत्तर काळातील आहे. यासाठी उपयोजित संस्कृत भाषा अभिजात संस्कृत म्हणून ओळखली जाते. या लेखनातील शब्द, वाक्यरचना तुलनेने सोपी आहे. भाषेत काळाप्रमाणे बदल होत जातात. परिणामी ऋग्वेदातील प्रारंभिक प्रार्थना समजण्यास काहीशी कठीण वाटते. पण अथर्वशीर्षातील दुसऱ्या म्हणजेच मु"य भागाची भाषा समजण्यास सोपी वाटते. खाली प्रारंभिक प्रार्थना आणि आशय दिला आहे.
प्रारंभिक प्रार्थना

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:।।
स्थिरैरंंगैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायु:।
ॐ स्वस्तिनइंद्रो वृध्दश्रवा: स्वस्तिन: पूषा विश्र्ववेदा:।
स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: स्वस्तिनो बृस्हस्पति र्दधातु।।
ॐ सह नाववतु। सहनौ भुनक्तु। सहवीर्यं करवावहै।
तेजस्विनावधीतमस्तुु। मा विद्विषावहै।
ॐ शांति: शांति: शांति:

हे प्रभू, आमचे कान, कल्याण करणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी तत्पर होवोत. हे पूजनीय देवांनो, आमचे डोळे, जे जे कल्याणकारक असेल, सर्वांना उपयुक्त वाटेल, त्या सर्व गोष्टी पाहण्यासाठी तत्पर होवोत. आमच्या सर्व अवयवांनी, शरीरांनी तत्पर होऊन आम्ही त्या परतत्वाचेच स्तवन करावे, चिंतन करावे.
आम्ही सर्वांनी एकत्रित संघटित रहावे, सर्वांनी सह अन्नग"हण करावे, आम्ही जे सर्व शिकत आहोत ते सर्व तेजोमय, चैतन्यमय आणि शक्तीदायी असावे. आमच्यामधील द्वेष, मत्सर, भावना नष्ट व्हाव्यात. सर्वच वेळा आमचे मन प्रसन्न, चैतन्याने भारलेले असावे.
ही प्रार्थना गणपती अथर्वशीर्षाच्या सुरूवातीला व शेवटी म्हणायची असते.

शांती मंत्र तीनवेळा का?

संस्कृत भाषा प्रगल्भ आहे. प्रौढ आहे व प्रेरणादायी आहे. हे गुण वरील मंत्रातील शब्दरचनेवरून सहज लक्षात येतात. "ॐ शांती' या मंत्राचा उच्चार नेहमी तीन वेळा करतात. आपले मन संकटापासून सुरक्षित आणि शांत करण्यासाठी या शब्दाचा उच्चार तीनदा करतात. माणसाला भेडसावणारी संकटे तीन प्रकारची असतात. त्यामध्ये अनुक"मे मनात, शरीरात विचारांचा क्षोभ होतो व मन अस्थिर होते. काही संकटे शरीरबाह्य असतात. यात सामाजिक वाद, मतभेद, सामाजिक व्याधी यांचा समावेश असतो. अनेक संकटे माणसाच्या, समाजाच्या शक्तीच्या पलीकडची असतात. उदा. भूकंप, पूर, वादळे. आपल्या मनाला व शरीराला या तिन्ही प्रकारच्या संकटांपासून शांती आणि सुरक्षा हवी असते म्हणून "शांती' हा शब्द तीन वेळा म्हणतात. (येथे एक उपपत्ती दिली आहे. आणखीही उपपत्ती असू शकतील.)

अथ श्रीगणेशाथर्वशीर्ष व्या"यास्याम:।।
ॐ नमस्ते गणपतये।।
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसी।।
त्वमेव केवलं कर्ताऽसि।।
त्वमेव केवलं धर्ताऽसि।।
त्वमेव केवलं हर्ताऽसि।।
त्वमेव सर्वं खल्विंद ब"ह्मासि।।
त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ।। 1।।

गणपती अथर्वशीर्ष हा मंत्र अथर्वण ऋषींनी लिहिला आहे असा उ"ेख साहित्यात सापडतो. या मंत्राची सुरूवात "ॐ' या उच्चाराने होते. सगळ्या संस्कृत वाङ्मयात मंत्राच्या सुरूवातीला मंगलाचरण लिहिताना शिष्टसंप्रदाय पाळण्याची परंपरा आहे. अथर्वण ऋषींनी स्वत: गणेशाचे स्वरूप अनुभवले ते या मंत्रातून विशद करतात. गणपती हा सर्व देवगणांचा स्वामी आहे असे भक्त मानतात. अशा गणपतीला मी (भक्त) नमस्कार करतो. हे गणेशा, या विश्वावर सत्ता गाजवणारे तत्व तूच आहेस, या सृष्टीचा निर्माता तूच आहेस. साहजिकच, या सृष्टीचा संहार तूच करू शकतोस. खरे तर या विश्वात सर्वांच्या अनुभवाला येणारे ब"ह्मतत्वसुध्दा तूच आहेस. हे अविनाशी आत्मस्वरूपही तूच आहेस.

ऋतं वच्मि।। सत्यं वच्मि ।।2।।

ऋषी म्हणतात, "मी तुझ्याविषयी या वर्णनात केवळ जे योग्य आहे, नेमके आहे तेच सांगेन. जे वचन सर्व कालात (भूत, वर्तमान व भविष्य) सत्य आहे, तेच या मंत्रात सांगत आहे.'
अव त्वं मां ।। अव वक्तारं।।
अव श्रोतारं।। अव दातारं।।
अव धातारं।। अवानूचानमव शिष्यं।।
अव पश्चात्तात्।। अव पुरस्तात्।।
अवत्तोरात्तात्।। अव दक्षिणात्तात्।।
अव चोर्ध्वात्तात्।। अवाधरात्तात्।।
सर्वतो मां पाहि पाहि समंतात्।।3।।

माणसाला कोणाचीही स्तुती करणे, चांगले म्हणणे असे पूर्ण स्वातंत्र्य नसल्याचा अनुभव नित्य येतो. पूर्वीही अशीच समाजस्थिती असावी. श्री गणेशाचे यथायोग्य वर्णन करण्यासाठी मंत्रकर्ता आपले रक्षण करण्याची येथे गणेशाकडे प्रार्थना करत आहे. हे गणेशा, तू माझे रक्षण कर, तुझ्या रूपाचे वर्णन करताना मला सुरक्षित ठेव. मी लोकांना तुझे स्वरूप सांगत आहे, त्यामुळे मला संकटांपासून वाचव. माझ्या शिष्यांना अभय दे. संकटे दहांही दिशांतून व निकटच्या सान्निध्यातून येतात, त्यापासून मला सुरक्षित ठेव.

त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय:।।
त्वमानंदमयस्त्वं ब"ह्ममय:।।
त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि।।
त्वं प्रत्यक्षं ब"ह्मासि।।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।।4।।

हे गणेशा, तूच वाणी, नाद, जीवस्वरूप आहेस. तुझे अस्तित्वच आनंदस्वरूप आहे. या सृष्टीत जे ब"ह्मस्वरूप अनुभवास येते, ते तूच आहेस. सत्, चित्, आनंद या त्रयींचे दर्शन तुझ्या ठायी मिळते. या सर्व गुणांमुळे तुझी अन्य कोणाशीच तुलना करता येत नाही. तुझे स्थान हृदयात साठवलेले आहे. ज्ञान आणि विज्ञान म्हणजेही तूच आहेस.

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते।।
सर्वं जगदिदं तत्वस्तिष्ठति।।
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति।।
सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति।।
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ:।।
त्वं चत्वारि वाक्पदानि।।5।।

हे सर्व जगच तू निर्माण केले आहे. तुझ्या इच्छेमुळेच ते सुरक्षित राहते. तसेच त्याचा शेवटही तुझ्याच इच्छेने होणार आहे. या जगात अनुभवास येणारी पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते म्हणजे तूच आहेस. आपल्या वर्णाला परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ही चार स्वरूपे लाभली आहेत. त्या सर्वांत आम्हाला तुझेच अस्तित्व भासते.

त्वं गुणत्रयातीत:।। त्वमवस्थात्रयातीत:।।
त्वं देहत्रयातीत:।। त्वं कालत्रयातीत:।।
त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं।।
त्वं शक्तित्रयात्मक:।।
त्वां योगिनो ध्यायंति नित्यं।।
त्वं ब"ह्मा त्वं विष्णुस्त्वं
रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं
ब"ह्मभूर्भुव:स्वरोम।।6।।

समाजातील जनसमुहांचे तीन विभाग लक्षात येतात. काही माणसे सत्त्वगुणी असतात, तर काहीजण रजोगुणी असतात. मग राहिलेली जनता तमोगुणी विभागात जमा होते. हे गणेशा, तू या त्रिगुणांच्या पलीकडील उच्च अवस्थेत आहेस. मनुष्याचे तीन प्रकारचे देह - स्थूल, सूक्ष्म व सुषुप्ती अस्तित्व प्रकार मानले गेले आहेत. त्याहीपलीकडे तुझे अस्तित्व आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन अवस्था तुझ्यासाठी नाहीत. मनुष्याच्या मूलाधार चक"स्थानात तुझे वास्तव्य असते. या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही शक्तींचा तूच अधिकारी आहेस. थोर ऋषिमुनी तुझेच मनन, चिंतन, पूजन करतात. तूच या सृष्टीचा कर्ता, पालक, लय करणारा आहेस. तू इंद्र, वायू, अग्नी, सूर्य, चंद्र, सृष्टीचा प्राण, पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग व ओंकार आहेस.

गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तद्नंतरं।।
अनुस्वार: परतर:।। अर्धेन्दुलसितं।।
तारेण ऋध्दं।। एतत्तव मनुस्वरूपं।।
गकार: पूर्वरूपं।। अकारो मध्यमरूपं।।
अनुस्वारश्र्वान्त्यरूपं।। बिन्दुरत्तररूपं।।
नाद:संधानं।। स हिता संधि:।।
सैषा गणेशविद्या।। गणकऋषि:।।
निचृद्गायत्रीच्छंद:।। गणपतिर्देवता।।
ॐ गॅं गणपतये नम:।।7।।

गणेशाचे असे सर्वात्मक स्वरूप सांगितल्यानंतर मंत्रकर्ता या देवतेची भक्ती कशी करावी याचा मंत्र भक्तांना सांगतात. "ग्' कार या वर्णाने या मंत्राची सुरूवात होते. "ॐ' मधील दुसरा वर्ण "अ' आहे. येथे शेवटचा वर्ण अनुस्वार आहे. या मंत्राचा उच्चार महत्त्वाचा असून तो परंपरेप्रमाणे करावा. या मंत्रात ब"ह्मदेव, विष्णू, शिव, सूर्य आणि ओंकार या पंचायतन देवतांचे अधिष्ठान मानले आहे.

एकदंताय विद्महे।
वक"तुण्डाय धीमहि।।
तन्नो दंती प्रचोदयात्।।8।।

अशा या एकदंताला (गणेशाला) आम्ही जाणून आहोत व म्हणूनच आम्ही या वक"तुंडाचे मनन, चिंतन आणि पूजन करतो. त्या ब"ह्मस्वरूप दंतीने (गणेशाने) आम्हाला त्याची भक्ती करण्याची प्रेरणा द्यावी.

एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्।।
रदं च वरदं हस्तैर्बिभ"ाणं मूषकध्वजम्।।
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्।।
रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपूजितम्।।
भक्तानुकंपिन देवं जगत्कारणमच्युतम्।।
(भक्तानुकंपितं हे भाष्यानुसार नाही)
आविर्भूतं च सृष्ट्यादौ
प्रकृते: पुरूषात्परम्।।
एवं ध्यायाति यो नित्यं
स योगी योगिनां वर: ।।9।।

गणेशाच्या धारणेसाठी हा मंत्राचा (9) भाग दिला आहे. ज्याला एक दात, चार हात असून ज्याच्या वरील उजव्या हातात पाश, वरील डाव्या हातात अंकुश, खालील डाव्या हातात हस्तदंत व उजव्या खालील हातात आशीर्वाद मुद्रा अशी गणेशाची मूर्ती आहे. उंदीर हे ज्याचे वाहन आहे, जो रक्त वर्णाचा आहे, जो लंबोदर आहे व ज्याचे कान सुपासारखे आहेत. ज्यांनी लाल वस्त्रे परिधान केली आहेत, ज्यांनी रक्तचंदनाची उटी अंगाला लावली आहे, ज्याची पूजा तांबड्या फुलांनी सजवली आहे असा हा गणेश आपल्या भक्तांवर निरंतर कृपा करतो. गणेश देवता सृष्टीची निर्मिती करणारी, अत्यंत प्राचीन, प्रकृती आणि पुरूष यांच्याही पलीकडे जाणारी आहे. या गणेशमूर्तीचे आम्ही नित्य, निरंतर ध्यान करतो. सर्व योगी पुरूषांपेक्षाही तो श्रेष्ठ योगी आहे.

नमो व"ातपतये। नमो गणपतये।।
नम: प्रमथपतये।।
नमस्तेऽस्तु लंबोदरायैकदंताय।।
विघ्ननाशिने शिवसुताय।।
श्रीवरदमूर्तये नमो नम:।।10।।

याप्रमाणे ध्यानधारणा केल्यावर गणेशाला नमस्कार करतात. देव समुदायांचा स्वामी, गणांचा प्रमुख अशा लंबोदराला, एकदंताला नमस्कार असो. गणपती विश्वाचा लय करणारी तसेच भक्तांना वर देणारी ती देवता आहे.
अथर्वण ऋषींनी लिहिलेले अथर्वशीर्ष येथे समाप्त होते. हा मंत्र पुन: पुन: उच्चारल्यामुळे जी फलप्राप्ती होते त्याचे विवरण खाली दिलेल्या मंत्राच्या तिसऱ्या भागात सांगितले आहे.

एतदथर्वशीर्षं योऽधीते।।
स ब"ह्मभूयाय कल्पते।।
स सर्वत: सुखममेधते।।
स सर्वविर्घ्नैबाध्यते।।
स पञ्चमहापापात्प्रमुच्यते।।

सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति।।
प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति।।
सायंप्रात: प्रयुंजानो आपापो भवति।।
सर्वत्राधीयानोऽपविघ"ोे भवति।।
धर्मार्थकाममोक्षं च विंदति।।

इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम्।।
यो यदि मोहाद्दास्यति
स पापीयान् भवति।
सहस्त्रावर्तनात् यं यं काममधीते
तं तमनेन साधयेत् ।।11।।
(अनुक"मे 11 "अ', 11 "ब' व 11 "क').

अनेन गणपतिमभिषिंचति।।
स वाग्मी भवति।।
चतुर्थ्यामनश्रन् जपति।।
स विद्यावान् भवति।।

इत्यथर्वणवाक्यं।
ब"ह्माद्यावरणं विद्यात्।
न बिभेति कदाचनेति।।12।।
(अनुक"मे 12 "अ' व 12 "ब').

यो दूर्वांकुरैर्यजति।।
स वैश्रवणोपमो भवति।।
यो लार्जैर्यजति स यशोवान भवति।।
स मेधावान भवति।।

यो मोदकसहस्त्रेण यजति।।
स वाञ्छितफलमवाप्नोति।।
य: साज्यसमिद्भिर्यजति।।
स सर्वं लभते स सर्वं लभते ।।13।।
(अनुक"मे 13 "अ' व 13 "ब').

अष्टौ ब"ाह्मणान् समम्यग्ग"ाहयित्वा
सूर्यवर्चस्वी भवति।।
सूर्यग"हे महानद्यां प्रतिमासंनिधौ
वा जप्त्वा सिध्दमंत्रो भवति।।
(आठ ब"ाह्मणांना हे अथर्वशीर्ष उत्तम प्रकारे शिकवले असता शिकवणारा सूर्याप्रमाणे तेजस्वी होतो.)

महाविद्यात्प्रमुच्यते।।
महादोषात्प्रमुच्यते।।
महापापात् प्रमुच्यते।।
स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति।।
य एवं वेद उत्युपनिषद्।।14।।
(अनुक"मे 14 "अ' व 14 "ब'.)

या मंत्रांची फलश्रुती 11, 12 आणि 13 या मंत्रविभागातून सांगितली आहे. या मंत्राचा आशय पुढे दिला आहे.
गणपती अथर्वशीर्षाचे पठण करणारा भक्त ब"ह्मस्वरूप मिळवतो. त्याला सुखप्राप्ती होते व तो संकटमुक्त होतो. सायंकाळी किंवा सकाळी किंवा दोन्ही वेळी या मंत्राचे पठण केले तर पापक्षालन होते व त्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरूषार्थांचा लाभ होतो. हा मंत्र अश्रध्देय माणसाला शिकवू नये तसेच शिकवताना धनाची अपेक्षाही बाळगू नये. मनात असलेली इच्छा पूर्ण होणाऱ्या या मंत्राची 1000 आवर्तने करावी लागतात.
या मंत्राने गणेशाला अभिषेक करणारा भक्त उत्तम वक्ता होतो. मंत्रकर्ता म्हणतो की, उपवास करून या मंत्राचे पारायण केले तर भक्त विद्यासंपन्न होतो व असा भक्त निर्भय बनतो. गणपतीचे पूजन दूर्वांनी करणारा भक्त सधन होतो. भाताच्या लाह्यांनी पूजन करणारा भक्त बुद्धिवान होतो. जो भक्त मोदकांचा नैवेद्य दाखवितो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. तुपाने आणि समिधांनी पूजन करणाऱ्याला सर्व सुखांचा लाभ होतो. आठ भक्तांना अथर्वशीर्ष म्हणावयास शिकवणाऱ्यास सूर्याप्रमाणे प्रतिभा लाभते. सूर्यग"हण काळात पवित्र नदीच्या काठी किंवा पवित्र मंदिरात जप केल्यास सिध्दमंत्रांची प्राप्ती होते. या मंत्राच्या पठणाने भक्त संकटांपासून, महापातकांपासून, महादोषांपासून मुक्ती मिळवू शकतो.
गणपती अथर्वशीर्ष मंत्राची येथे समाप्ती होते. यानंतर प्रारंभिक प्रार्थना पुन्हा एकदा म्हणावी. हा अथर्वशीर्ष मंत्र स्नानानंतर, धूतवस्त्र नेसून पवित्र आणि शांत ठिकाणी पठण करावा. यावेळी मन शुद्ध आणि स्थिर असावे. हा मंत्र एकट्याने अगर सामूहिक पद्धतीने म्हणावा व त्यानंतर श्री गणेशाची आरती म्हणावी. गेली हजारो वर्षे लक्षावधी भक्तांनी याप्रमाणे तप:चरण केले व त्यांनी आपले जीवन संपन्न, समृद्ध केले आणि अपूर्व समाधानाचा लाभ घेतला.

3 comments:

Anonymous said...

very very knowledgeable.I impressed lot. Ganesh god is great. I am devotee of GOD Ganesh. Ganesh is every where. I demand God Ganesh make Happy every one.
PORE S.L. Vashi, Navi Mumbai

smitvikb said...

Khup chan ahe. atharvshirsha baddal khup chan savistar mahii dilyabaddal dhanyawad.

onkar said...

Loved it !!!
!! OM MAHAGANADHIPATAYE NAMAH !!