बालपणातली चवथ

शरत्चंद्र आ. देशप्रभू

"नेमेचे येतो पावसाळा' या उक्तीनुसार उंच गणेशमूर्ती आणि समुद्रात केले जाणारे विसर्जन हे मुद्दे दरवर्षीप"माणे ऐरणीवर आल्याचे मुंबईच्या वृत्तपत्रातील वृत्तांत वाचून समजले. हे मुद्दे भावनिक असले तरी पर्यावरणाचा आणि पर्यायाने आपल्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम याचा विचार वैज्ञानिकदृष्टीने झाला पाहिजे. दोन्ही प्रश्नांना पूरक असा सर्वसमावेशी, पर्यावरण सुसंवादी कार्यक"म शासकीय व संस्थांच्या पातळीवर आखण्याची व राबवण्याची आज निकड होऊन बसलेली आहे.
आजच्या या हायप्रोफाईल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मला आठवते गतकालीन सरंजामशाहीच्या मावळत्या काळात पेडणे गावात साजरी केलेली आमच्या घराण्यातील चवथ. श्रावण महिन्यास प्रारंभ म्हणजेच खऱ्या खुऱ्या अर्थाने सण साजरे करण्याचे मुक्तद्वार. आकुलो कुकुलो, सुताची पुनव, नागपंचमी व जन्माष्टमी अशी संगतवार सणांची मांडणी. शिवाय श्रावणी सोमवार, शनिवार तसेच रविवार पण जोडून साजरे करण्याचा कोकणात प्रघात आहेच. कदाचित हे सर्व सण श्रावणात पूर्वनियोजित केले असले पाहिजेत, ते पुढचे मेगा इव्हेंट गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठीची मनोभूमिका निर्माण करण्यासाठीच. कारण चतुर्थीचे वेध खऱ्या खुऱ्या अर्थाने श्रावणमासीच लागायचे.
आमच्या घरी गणपती घरी करण्याची प्रथा असल्यामुळे शाडूच्या मातीची "ओझी' कोरगांवहून येत. ही ओझी गुळाच्या ढेपांच्या आकाराची किंबहुना जरा मोठीच असत. मातीची ओझी फोडून भिजवण्या फुगवण्यापासून ते मूर्ती रंगवून तयार करीपर्यंतचा अनुभव रोमांचकारी असे. माती फुगल्यावर गणपती थापायची कृती होत असे. यानंतर महत्त्वाचे काम म्हणजे आकार देणे. यात हात, कान, नाक, सोंड चिकटवणे होत असे. साचा वापरणे प्रतिष्ठेच्या साच्यात बसत नव्हते. नंतर आले सुकवणे. तोपर्यंत जन्माष्टमी यायची. यानंतर खडबडीत मूर्ती धातूच्या प्लेटच्या आधाराने नितळ करणे, हा सारा प्रकार विस्मयजनक असे. आमचा गणपती करण्याची प्रकि"या चतुर्थीपूर्वीच एक महिना व्हायची. कारण मूर्तीच्या अंगकांतीचा रंग शुभ". माती ओलसर राहिली तर शुभ" रंग काळवंडतो. यासाठी मूर्ती सुकवण्यासाठी पुरेपूर अवधी देणे उचित ठरते. नंतर बोळु घोटून घोटून केलेला रंग तीन थरांनी मूर्तीला लावला जात असे. आतासारखा ऑईलपेंट नव्हता. यानंतर मुकुट भरणे. वेगवेगळ्या आकाराच्या विविध रंगी चमक्यांनी मुकुट कलात्मक रीतीने सजवायचे. हे काम नाजूक असल्यामुळे घरची मंडळी पण कोरगांवहून येणाऱ्या अनुभवी कारागिरांना हातभार लावीत असे. नंतर कालौघात ही प्रथा बंद पडली व त्याची जागा मुकूट रंगविण्याने घेतली. हे काम पण जिकिरीचे होते. मातीच्या मुकुटाला गोंदवजा द्रव फासून मूर्तीकार सोनेरी पावडर हाताच्या तळव्यावर ठेवून एका फुंकरीने मुकुटावर उडवून मुकुट रंगवीत असे. हे काम करायला अंगी उपजतच कला असावी लागे, कारण सोनेरी पावडरीच्या फुंकरीने चढवलेला थर मुकुटावर समान व्हायला बरीच कसरत करावी लागे. यातून दुहेरी हेतू साध्य होई. सोनेरी पावडर फुंकरताना उडालेले कण चपखलपणे पितांबराला चिकटून बसत. त्यामुळे पितांबर जर लावल्यासारखा झगमगून उठे. यानंतर नजर उघडणे व गावच्या सोनाराने येऊन मूर्तीच्या हातात सोनेरी वर्ख दिलेली मेणाची कंकणे भरवणे आदी सोपस्कार पूर्ण होत. आमच्या आजोळी श्रीमंत आरोबेकर देसाई यांच्या वाड्यावर सहा फूटी मूर्ती करत. त्यासाठी पन्नास ते साठ ओझी लागत.
त्यावेळचे मखर करणे एक आनंददायी यातायात! मखराची रचनाच कलाकुसरीमुळे लक्षात राहण्याजोगी होती. मखर उभारणे व पट्टे कापणे सुरू झाल्यावर साऱ्या कुटुंबियांत अवर्णनीय उत्साह संचारत असे. मखराच्या उभ्या आडव्या लाकडी पट्ट्यांचे मोठ्या कुशलतेने मोजमाप घेऊन कापलेले रंगीबेरंगी पट्टे एखाद्या झावळाप्रमाणे उभे आडवे विणायचे. हे काम किचकट असले तरी वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे त्यावेळीसुध्दा बघायला लोकांची गर्दी उसळत असे. कालांतराने हे मखर जीर्ण झाल्याने अडगळीत टाकले, परंतु नंतर कित्येक वर्षे लोक या मखराची आठवण काढून उसासे टाकीत. आरोबा येथे देवदेवतांचे फोटो असलेले मखर करायचे.
चतुर्थीच्या पूर्वसंध्येला घरच्या परंतु पेडणे महालात विखुरलेल्या पिढीजात सेवेकरांना "परब' वाटायची पध्दत होती. अजूनही आहे. यावेळी सेवेकऱ्यांना दर्जाप्रमाणे नारळ व पैसे देत असत. ही पध्दत पिढ्यानपिढ्या चालून आलेली आहे. टिकून आहे - यातील उदात्त हेतूमुळे... चवथीला कुणाला अडचण भासू नये हाच एकमेव उद्देश.
मूर्तीची षोडशोपचार प्राणप्रतिष्ठा करण्याची जबाबदारी पुरोहिताची. हे पुरोहित आपली सेवा एकाच कुटुंबाला वाहत असत. त्याकाळी अशा पुरोहितांंना व सेवेकऱ्यांना जमिनीचा तुकडा दिलेला असे. याला उत्पन्न तोडून देणे असे म्हणत. या जमिनीची मालकी कुटुंबाकडे असली तरी भोगवटा सेवेकऱ्याकडे. यात शाडूची माती पुरविणारे, मूर्ती घडवणारे कुंभार, शेणसडा करणारे, माटोळी बांधणारे, आरती करणारे, सोनार, गणपती वाहून नेणारे, पार्सेचे मुसलमान वाजंत्री यांचा समावेश असे. ज्यांना उत्पन्न तोडून दिलेले नसल्यास त्याची भरपाई "परब' देऊन करत असत. कालांतराने कुळकायदा आल्यावर ही प्रथा अस्तंगत झाली, तरीही काही घराण्यांत या पुरातन संस्थेचे अवशेष आढळून येतात. त्यावेळचे आमचे पुरोहित एवढे शुर्चिभूत की घरून पाच ते सहा किलोमीटरचे अंतर पायतणे न वापरताच येत. परंतु आता मला प्रश्न पडतो की हे गृहस्थ खडावा का वापरीत नसत? प्राणप्रतिष्ठेचे षोडोशोपचार झाल्यावर गणपतीची मूर्ती एका आगळ्या तेजाने झळाळून जाई. इतकेच नव्हे तर गणपती पुजण्याचे मोठे "साल' एका भारलेल्या वातावरणाने आच्छादित होत असे. सगळीकडे अवर्णनिय लहरी व स्पंदने जाणवू लागत! यातील श्रध्देचा भाग व वैज्ञानिक सिध्दांत कदाचित "सनातन'वाले आपल्या परीने विशद करू शकतील. परंतु एकंदर वातावरण चार्जड् वाटायचे. ही स्थिती दीड दिवस म्हणजे उत्तर पूजेपर्यंत टिकत असे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी ताशावर काठी पडली की अंग शहारून येत असे. दोन दिवस वाजंत्री आणि मुले यांची चांगली गट्टी जमायची. वाजंत्री धर्माने मुसलमान असले तरी त्यांचा गणपती उत्सवात सहभाग असे. दुरून का होईना ते आमच्यासमवेत सुरात, तालात आरती म्हणत असत. दोन दिवस मांस-मच्छीचे जेवण विसरून सुग"ास भोजनाचा आस्वाद घेत. आम्ही चंद्रज्योती पेटवून उरलेले तारांचे तुकडे या वाजंत्र्यांकडे सुपूर्द करीत होतो. त्याचा उपयोग ते बायकांसाठी वेगवेगळे आकडे करण्यासाठी करत. हे वाजंत्री मनमिळावू स्वभावाचे असल्यामुळे त्यांचे सर्वांशी सलो"याचे संबंध होते. या वाजंत्र्यांचा मुक्काम गणेश विसर्जन होईपर्यंत असायचा. आम्हा देशप्रभू घराण्यातील सर्व गणपती मूर्तींचे विसर्जन पेडण्याहून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नईबाग नदीवर होते.
गणेश चतुर्थीच्या रात्री आरती, नंतर पुराण व कीर्तन व्हायचे. पुराण सांगण्याचे काम पिढीजात पुजारी कुटुंबातील व्यक्ती करत. पुरोहिताचा यात सहभाग नसे. माझ्या आठवणीतल्या पुराणिकांंना अंग घुसळून पुराण सांगण्याची सवय होती. ते "तेव्हा' व "आणि' या शब्दांचा वाक्यागणिक उच्चार करायचे. "तेव्हा' हा शब्द "तेंहा' असे उच्चारायचे. त्यांच्या या लकबीमुळे कदाचित त्यांचे पुराण श्रवणीय होत असेल. कीर्तनाचा भार मळगांवकर कुटुंबावर. हे शाक्त पंथी. मळगांव (महाराष्ट्र) गावातून हे दिवसा किंवा रात्री कंदील घेऊन चालत येत असत व देशप्रभूंच्या वाड्यात कीर्तन करत. मला आठवतात ते शेवटचे मळगांवकरबुवा हे शेवटी तर एवढे विकलांग झाले होते की कीर्तन करतेवेळी पेंगत व नकळत देवाकडे पाठ करून आ"यान चालू ठेवत. मग त्यांना यजमान प्रेमाने खडसावत. "अहो बुवा, तुम्ही कीर्तन खंय करतात? देवापुढे की देवाच्या फोटोफुडे', मग बुवा खजिल होऊन वळून आ"यान चालू ठेवत. आ"यान कसले तर देवदेवतांचे चमत्कार व प्रबोधन राहिले बाजूलाच आणि भर स्वत:च्या जीवनातले प्रसंग कथन करण्यावर - चर्वितचर्वण केलेले. बुवांचे लक्ष बारीक वात करून ठेवलेल्या कंदिलाकडे. कारण जेवढे कीर्तन लांबेल तेवढे दिव्यातील केरोसीन जळणार. दोन रुपयांच्या बिदागीत तर वाढ होणे शक्य नाही! तीही नियमित मिळाली नाहीतर नवरात्रौत्सवात देण्याचे पोकळ आश्वासन. त्यावेळी हे बुवा आमच्या चेष्टेचा विषय होत. आता जाण आल्यावर वाईट वाटते. परंतु दारिद्य"च इतके भयानक की हे बुवा पाच कुटुंबांतून मिळणाऱ्या दहा रुपयांच्या बिदागीसाठी खस्ता काढायचे. त्यादिवशीच्या कार्यक"माची सांगता कलावंतिणीने केलेल्या गणेश वंदनेने (नृत्याद्वारा) होत असे. ही कलावंतीण वयस्कर, परंतु घराण्याच्या सेवेत खंड पडू नये म्हणून येत असे. या कलावंतिणीने भक्तीभावाने केलेली गणेश वंदना विस्मरणात जाणे कठीण. नव्हते आवाजात माधुर्य ना गाण्यात लय ना पदन्यासात ताल! परंतु तिची घराण्यावरची अविचल निष्ठा आम्हांस अचंबित करीत असे.
त्याकाळी आमच्या गावात वीज नव्हती. पेट्रोमास दिवेपण क्वचितच. अल्लाउद्दिनच्या स्वयंचलित दिवाबत्तीने प"वेश केलेला. परंतु ती दिसे तुरळक वाड्यांत. पण समईच्या मंद प्रकाशात उजळलेली सुशोभित गणेशमूर्ती पाहण्याचे भाग्य वेगळेच. तेवणाऱ्या समईमुळे मूर्तीसभोवती एक आकर्षक तेजोवलय निर्माण होत असे व मूर्तीच्या सात्विक चेहऱ्यावरचे भाव जास्तच आश्वासक वाटत.
त्याकाळी प्रचलित प्रथेप्रमाणे जाणती मंडळी चंद्रदर्शन होण्याच्या व पर्यायाने आळ येणाचा संभव असल्याने बाहेर न पडणेच पसंत करत, परंतु आमच्यातील काही खोडकर मुले, "तो बघ, माळयेच्या छपराचेर वानर बसला' असे वरच्या दिशेला बोट दाखवून चंद्रदर्शन करवीत. आम्हीपण गाफील म्हणून फसायचो. नंतर कळून यायचे की वानरे रात्रीच्या अंधारात संचार करीत नाहीत. व गणेशोत्सवाच्या पाच दिवसांंत तरी हे हनुमानाचे प्रतीक फटाक्याच्या आवाजाने कुठेतरी अंतर्धान. मग आळ न येण्यासाठी खोटी खोटी चोरी आणि वर वर शिव्यांची लाखोली.
आमच्या लहानपणी दारूकामाचे सामान चीनहून माकावद्वारे येत असे. माकाव हे पोर्तुगीज वसाहतील बेट. त्यावेळी लवंगी फटाके प्रसिध्द. परंतु का कोण जाणे, आम्ही अ"खा फटाका क्वचितच पेटवू! माळेतील बत्तीस "फुगट्यो' वेगवेगळ्या काढून विविध तऱ्हांनी पेटवायचो. कांही व"ात्य मुले शेणात फुगेटी पेटवून शेणाचे शिंतोडे सवंगड्यांवर उडवीत व टाळ्या पिटत. नारळाच्या करवंटीत पण फुगेटी पेटवून करवंटी हवेत भिरकावलेली पाहून मजा लुटत. काही मुले घरामागच्या खाजगी तळीच्या पृष्ठभागावर पेटत्या फुगेटीचा स्फोट करून पाण्याचे तुषार उडवित. या प्रयोगात टायमिंगचे भान ठेवणे अत्यंत जरूरीचे असे. असे विविध प्रकार व तऱ्हा!
ऋषिपंचमीचा दिवस उजाडल्यावर मनात कालवाकालव व्हायची. संध्याकाळी गणेश विसर्जन होणार आणि आम्ही स्वर्गीय आनंदाला मुकणार. आमची चवथ दीड दिवसांची असल्यामुळे जास्तच खंत वाटायची. आमच्या घराण्यात दीड दिवसावर नवसाप्रित्यर्थसुध्दा गणपती ठेवण्याचा प्रघात नाही. विषण्णतेचा आलेख दिवसभर वाढतच व्हायचा. सुग"ास भोजन रुचत नसे. तशाच अवस्थेत आम्ही विसर्जनासाठी लागणारे फटाके गोळा करायचो. उरलेले आनंदाचे क्षण हातातून निसटू नयेत म्हणून कसोशीने प्रयत्न करायचो. उत्तरपूजेनंतर उदासिनता उच्चबिंदू गाठायची. मग फटाक्यांच्या कर्णकर्कश (फक्त विसर्जनावेळी) आवाजात व वाद्यांच्या जोशात गणपतीची मिरवणून होत असे. आम्ही गणपतीसोबत चालत व्हायकाउंट स्कूलपर्यंत जायचो. गणपती वाहून न्यायला "माचील' असे. अजूनही आहे.
चवथीचा आनंद घेण्यासाठी चवथ मनात फुलली पाहिजे. आणि तीही श्रावण मासाच्या आरंभीच! आताशा चित्र वेगळेच दिसून येते. पूर्वी गणेश विसर्जन केल्यावर चेहरे कोमेजत, तर आता विसर्जन केल्यावर लोक चिंतामुक्त होतात. कारण काय तर आत्यंतिक ताणतणाव, अंतर्गत वाद, अपुरे मनुष्यबळ व एकत्र कुटुंब पध्दतीचा ऱ्हास. कालाय तस्मै नम:!

No comments: