शास्त्रोक्त गणेशपूजन

चिंतामणी रा. केळकर

कोंकणवासियांचे गणेशोत्सवाचे "अप्रूप' सर्व सणांपेक्षा जास्त असते हे सर्वश्रुत आहे. शिवाय गणेशभक्त अगणित असल्याने गणेश हाच अग"पूजेचा मानकरी आहे.
प्रत्येकाच्या ऐपतीनुसार "सरंजाम' असला तरीही गरीब-श्रीमंत किंवा घरचा अथवा सार्वजनिक गणपती असो, सर्वच भाविकांना आपल्या इष्टदेवतेची पूजा विधिवत व्हावी असे वाटणे स्वाभाविक आहे.
पूजा साहित्याची प्रतिवार्षिकप्रमाणे सर्वांनाच माहिती असते; पण ती सहजसुलभ मिळण्यासारखी ठेवणे आवश्यक असते. या उत्सवात एवढा खर्च केला जातो की, प्रत्यक्ष गणपतीच्या पूजेला लागणाऱ्या वस्तूंचा खर्च फारच गौण असतो. या पूजेसाठीच्या बऱ्याचशा वस्तू घरातच उपलब्ध असतात व थोड्याशाच विकत आणाव्या लागतात. महत्त्वाचे म्हणजे फुले, फळे, पत्री वगैरे गावात सहज उपलब्ध होतात.
पुरोहिताला पूजेसाठी फारच कमी वेळ असतो त्यामुळे सर्व तयारी जय्यत ठेवणे हे प्रत्येक समाजाचे कर्तव्य आहे. अन्यथा वेळ वाया जातो व "आपत् धर्म' म्हणून कशीबशी पूजा आटोपावी लागते.
पुढे क"मानुसार "शास्त्रोक्त गणेशपूजा' कशी असते हे सांगितले आहे.
पूजाविधीसंबंधी अनेक पुस्तके, पोथ्या उपलब्ध असतात. थोड्याफार फरकाने त्यात वेगवेगळे मंत्र असतात, परंतु "सर्वदेवपूजा' म्हणजे जी सर्व देवांना चालते तीच विशेष प्रचारात असते. कोणत्या देवतेला काय आवडते किंवा काय वाहावे व काय वाहू नये याबद्दल सर्वांना माहिती असते. शिवाय या पूजेचा संकल्पच "प्रति वार्षिक विहितं श्रीपार्थिव गणपती किंवा उमामहेश्र्वरसहित श्रीपार्थिव गणपती पूजनं करिष्ये' असाच आहे. म्हणजे दरवर्षीच्या पद्धतीने ही प्रथा सर्वांनाच माहीत असते.
आचमन करून व संकल्प करून, त्यानंतर कलश, घंटा, शंख, समई यांची पूजा स्वत:वर व तेथील सर्व पूजासामग"ीवर पाणी शिंपडून (याला प्रोक्षणाविधी म्हणतात) पूजेला आरंभ होतो.
यानंतर गणेशपूजा. अग"पूजेचा मानकरी म्हणून "महागणपती पूजनं करिष्ये' असा संकल्प करून नंतर पंचामृतविरहित आवाहन - आसन (अक्षता), पाद्यं (पाणी), अर्ध्य (पळीत पाणी व त्यात गंधफूल घालून वाहाणे), वस्त्र (कुंकुमयुक्त कापसाचे वस्त्र किंवा अक्षता) नंतर गंध, हळद, कुंकू, दूर्वा घालून उदबत्ती, दिवा, नैवेद्य दाखवून विडा व त्यावरील नाण्यांवर पाणी सोडावे. नंतर कार्यारंभी तुझे पूजन करतो अशा अर्थी -
कार्य मे सिध्दीमायांतु प्रसन्नो त्वयिधातरी।
विघ्नविनाशमायांतु सर्वाणि सुरनायक।।
अनयापूजया विघ्नहर्ता महागणपती: पि"यताम् असे म्हणत ताम्हणात हातावरून उदक सोडावे.
आपणाला अभिप्रेत गणपती म्हणजे पार्थिव. मातीची मोठी उत्सवमूर्ती आणि ताम्हणात तांदळांवर आपल्याकडे सोंड करून ठेवल्या नारळाची महागणपती म्हणून असलेली पूजा हे दोन वेगवेगळे भाग आहेत हे नेहमी लक्षात घ्यावे. नारळाऐवजी सुपारीही ठेवण्याची पद्धत आहे. विडा, दक्षिणा (नाणे), नैवेद्य सर्व एकाच ठिकाणी ठेवतात. पूजाविधी संपल्यानंतर या गणेशपूजेचे विसर्जन करून ती ब"ाह्मणाला दिली जाते. जर उत्सव संपेपर्यंत यत्किंचितही हलणार नसेल तरच ठेवावी. तिचे विसर्जन करणे माझ्या मते योग्य वाटते.
उत्सवादरम्यान रोजच्या पूजेतही गणेशपूजा न ठेवता "महागणपती स्मरणंच करिष्ये' असे म्हणून गणपतीचा एखादा मंत्र म्हणून नंतरच पूजाविधी करावा. या उत्सवादरम्यान इतर काही दैनंदिन कार्ये करायची तर त्या प्रत्येकवेळी वेगळी गणेशपूजा ठेवणे स-शास्त्र आहे.

प्रथा आणि पद्धत

कोंकण प्रांतात पार्थिव गणपती सोबत उमामहेश्र्वराची (याला गौरी महादेव म्हणतात) पूजा करण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी व काही समाजात - जातीत ही प्रथा नाही. काही ठिकाणी काही जातीत याबद्दल हरितालिकांची महेश्वरासहित वेगळी पूजा प्रामु"याने स्त्रियांकडून केली जाते.
गौरी महादेव : महादेवस्वरूपी अ - सोला नारळ आपल्याकडे देठ करून ठेवला जातो. गौरीस्वरूप म्हणजे झाडांच्या फुलापानांभोवती गौरीचे चित्र गळेसरीने बांधून ठेवले जाते.
पार्थिव गणपती व उमामहेश्वरसहित एकच पूजा करण्यापेक्षा अगोदर उमामहेश्वराची पूजा व नंतर मु"य उत्सव मूर्ती - अभिप्रेत पार्थिव गणपतीची पूजा करणे पद्धतशीर व योग्य असते. उपलब्ध जागा, आरास - मांडावळ याचा विचार करता असे करणे योग्य वाटते.
प"थमत: गणेशपूजेत दिल्याप्रमाणेच ही पूजा करून घ्यावी. महादेवाला कुंकूविरहित दुपदरी वस्त्र, जानवे जोड, चंदन, अष्टगंध पांढरी किंवा पिवळी फुले, बेल या उपचाराने पूजाविधी, तर गौरीला कुंकू लावलेले दुपदरी वस्त्र, हळद कुंकू, सर्व प्रकारची फुले, तुळशीपत्र घालावे. विडा, दक्षिणा, नैवेद्य हे सर्व अर्पण करावे.
"श्री उमामहेश्वराय नम: ......... (उपचाराचे नाव/कृती) समर्पयामि' एवढेच म्हणणे पुरेसे आहे.
मु"य पार्थिव, गणपतीच्या पूजेचे मंत्र, अर्थ व वाहण्याच्या उपचारांची सर्व माहिती वगैरे सर्व स्थलसंकोचास्तव देणे अशक्य आहे. देवतेची पूजा ही षोडशोपचार असते. म्हणजेच 16 प्रकारचे उपचार असून त्याचा जो क"म आहे त्याच क"माने ही पूजा होणे म्हणजेच शास्त्रोक्त पूजाविधी होय. आपण जे चिंतितो किंवा अर्पण करतो ते प्रत्यक्ष वस्तू व कृतीने देवाला समर्पण करतो हे लक्षात घ्यावे. म्हणूनच प्रत्येक उपचारानंतर त्या कृतीचे किंवा वस्तूचे नाव ... घेऊन "समर्पयामि' असे म्हटले जाते.

एक महत्त्वाचा बीजमंत्र

"गं।।' हा गणपतीचा बीजमंत्र आहे. कारण गणपती अर्थवशीर्षामध्ये : ग कार: पूर्वरूप, अकारो मध्यमरूपं, अनुस्वार : श्र्चान्त्यरूपं, बिंदुरूत्तर रूपं ... असे वर्णन केलेले आहे. (मंत्र सामर्थ्य अगाध आहे. मंत्रशास्त्र - मंत्रविधान याबद्दल तर काय सांगायचे! बीजमंत्र हा तर फारच प्रभावी असतो.)
अपुरी पुरोहितांची सं"या, गडबड, ठराविक वेळ या सर्वांचा विचार करता तुम्ही जे उपचार वाहणार आहात, त्याबद्दलचे प"त्येकाचे वेगळे मंत्र असूनही केवळ "श्री गं गणपतये नम: .... (उपचार - कृतीचे नाव) समर्पयामि' एवढेच म्हणून क"मानुसार जर पूजाविधी केलात तर तो "स-शास्त्र'च होईल.ं
पंचोपचार व षोडशोपचार हे पूजाविधीचे दोन प्रकार असून सायं किंवा रात्रीची पूजा आंघोळ करून सोवळ्यातच पंचोपचार करण्याची पद्धत आहे. हे पाच उपचार म्हणजे - गंध, फूल, धूप, दीप व नैवेद्य. उदाहरणार्थ - बीजमंत्राने गणपतीची पंचोपचार पूजा करायची तर - 1) श्री गं गणपतये नम: चंदनं समर्पयामि, 2) श्री गं गणपतये नम: पुष्पं समर्पयामि, 3) श्री गं गणपतये नम: धूपं समर्पयामि, 4) श्री गं गणपतये नम: दीपं समर्पयामि, 5) श्री गं गणपतये नम: नैवेद्यं समर्पयामि.
आचमन करून स्वत:ला आणि कुंकुमातिलक लावून नंतर एखादा गणेशमंत्र म्हणावा व वरीलप्रमाणे जर पूजा केली तर ती पूर्णत: "स-मंत्रक'च व "स-शास्त्र'च होईल. घंटानाद जो केला जातो, तो स्नाने धुपेच, दिपेच तथा निरांजनेचिच एवढ्या वेळातरी असावा असे वचन आहे. षोडशोपचारांत "अक्षता' नाहीत, पण प्रत्यक्ष पूजाविधीत त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या वाहणे आवश्यक. शिवाय एखादा उपचार नसता किंवा जानवे वस्त्रादि उपचार परत परत बदलायचे नसल्याने त्यावेळी नाव घेऊन अक्षताच घालतात.
"द्रव्याभावे प्रदातव्या क्षलिता: तंदुला: शुभा:' असे वचन आहे. उदा. "श्री गं गणपतये नम: उपवस्त्रार्थे (जानव्याबद्दल) अक्षताम् समर्पयामि' म्हणावे.

षोडशोपचार : 16 उपचार

यांचा क"म आणि त्यानुसार काय वहावे व इतर महत्त्वाच्या गोष्टी पुढे दिल्या आहेत. गणपतीचा एखादा मंत्र ध्यान करून पूजारंभ करावा.
1) आवाहन - प्रीत्यर्थ अक्षता, 2) आसनं - प्रीत्यर्थ अक्षता, 3) पाद्यं - पळीने किंवा दूर्वा-फुलाने पाणी, 4) अर्ध्य - पळीत पाणी घेऊन त्यात गंध, लहानसे फूल किंवा फुलाची पाकळी घालून वाहणे, 5) आचमन - पळीने किंवा दूर्वाफुलाने पाणी, 6) स्नानम् - पळीने किंवा दूर्वाफुलाने पाणी. (पंचामृत - दूध, दही, तूप, मध, साखर मिश्रण.)
सहाव्या उपचारानंतर पंचामृत वरीलप्रमाणेच पळी किंवा दूर्वा अथवा फूल बुडवून घालणे. यावेळी गंधोदक म्हणजे पळीत चंदन घालून स्नान, सुगंधित द्रव्याने स्नान, उष्णोदक म्हणजे गरम पाण्याने स्नान घालणे. प्रत्येक स्नानानंतर शुध्दउदक घालणे. उदा. "श्री गं गणपतये नम: उष्णोदक स्नानांतरेण शुध्दोदक स्नानम् समर्पयामि' अशा प्रकारे स्नानापर्यंत पूजाविधी करावा. आपणाला येत असलेले स्तोत्र म्हणत गणपतीवर दूर्वेने पाणी/दूध घालत राहून अभिषेक करावा. उरलेल्या पंचामृताचा "श्री गं गणपतये नम: पंचामृत शेष नैवेद्ये समर्पयामि' असे म्हणून नैवेद्य दाखवून गंधफूल वहावे. (शेष नैवेद्य हेच तीर्थ मानतात.) एवढ्यापर्यंतच्या पूजाविधीला पूर्वपूजा म्हणण्याचा प्रघात आहे.
षोडशोपचारांतील पुढील उपचार क"मान्वये -
7) वस्त्रं - कापसाचे प्रत्येक मण्यामध्ये कुंकू लावलेले 5, 11 किंवा 21 मण्यांचे दुहेरी (जोडीने) वस्त्र, 8) उपवस्त्र - जानवे जोड, देवाच्या डाव्या खांद्य़ावरून उजव्या हाताखाली, 9) गंध - चंंदन व याचवेळी रक्तचंदन, हळद, कुंकू, अबीर एका, अष्टगंध, सुगंधी द्रव्ये वाहावी, अक्षता वहाव्या, 10) पुष्पं - यावेळी वेगवेगळी फुले, दूर्वा, शमी बेल, पत्री, 11) धूपं - उदबत्ती किंवा प्रत्यक्ष धुपाटण्यातील धूप, घंटानाद, 12) दीपं - एकारती शक्यतो शुद्ध तुपाची फुलवात, घंटानादासह, 13) नैवेद्य - जेथे नैवेद्य ठेवतात त्याखाली पाण्याने चौकोनी मंडल करावे. साधा किंवा महानैवेद्य, मोदक, करंज्या वगैरे नैवेद्य. याचवेळी तांदुळ म्हणजे विडा, त्यावर नाणे दक्षिणा म्हणून, एखादे फळ किंवा नारळ ठेवून पाणी सोडणे. पंचारती घेऊन घंटानाद करत दाखवणे..."श्री गं गणपतये नम: महानिरंजन दीपं समर्पयामि' असे म्हणून आरत्या म्हणाव्या. कापूर पेटवणे (कर्पूरार्तिक्य दीपं समर्पयामि') 14) प्रदक्षिणा - स्वत:भोवती 3, 5, किंवा 7 वेळा फिरणे, 15) नमस्कार - साष्टांग 16) मंत्रपुष्प - ओंजळीने देवावर फुले वहावी. "श्री गं गणपतये नम: मंत्रपुष्पं समर्पयामि' असे म्हणत आपल्या मनातील इच्छा संकल्प सांगणे म्हणजेच "गाऱ्हाणे' घालावे.
येथपर्यंत षोडशोपचार विधिवत पूजा झाल्यानंतर परत एकदा हातावर पळीतून पाणी घेऊन "श्री गं गणपतये नम: अनेन यथाज्ञानेन यथा मिलीतो पचार: द्रव्यै: ध्यानावाहनादी षोडशोपचार पूजना"येन कर्मणा श्री भगवान गणपती: प्रियताम् न मम' असे म्हणून हातातील उदक ताम्हणात सोडणे.
पुन्हा - "श्री केशवाय नम:, श्री नारायणाय नम:, श्रीमाधवाय नम:' असे म्हणत आचमन करावे व पुढे "गोविंदाय नम:, विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नम:' असे म्हणून या यथासांग (षोडशोपचारसहित, सशास्त्र, समंत्रक) पूजाविधीची सांगता होते.


----------------------
-1-
सत्यनारायणाची आरती

जयदेव जयसत्य नारायण देवा
शक्तीभावे करतो पदपंकज सेवा ।।धृ।।
आर्तांचा कैवारी दीना कनवाळू।
पालन पोषण करिसी त्राता मायाळू।।
संंकटनाशक होसी तूची कृपाळा।
आधिव्याधी पिडा नाश करी सकळा।।
व्यापुनि साऱ्या विश्र्वा दशांगुळी उरला ।
प्रलयानंतर सृष्टी रचिता जाहला ।।
अनादी अंतीही विश्र्वीं तू सारा।
तुझिया मायेचा हा खेळ सारा।।
तुजविण देवा जग हे आहे निरर्थ।
नारायण योगे नर हो कृतार्थ।
नश्र्वर विश्र्वीं तू नारायण सत्य।
नतमस्तक नमितो नारायण नित्य।।

- रचना: नारायण रामचंद्र केळकर

-2-
जयकाल जयईश जयसत्यदेवा
तुझिया दासांचा प्रणिपात घ्यावा ।।धृ।।
शंख चक" गदा पद्म तुझ्या हाती
कंठी वनमाला सुंदर शोभती।
श्रद्धा भक्ती ठेऊनि व"त जे आचरती
त्यांच्या पुरती इच्छा विघ्नेही हरती।।
केवळ संयावके तू तृप्त होसी
तुलसी दल अर्पिता सत्वर पावसी
सत्यदेव नामे कलियुगी तव "याती
सेवे ईप्सित देऊन मोक्षपदा नेसी।।
पंचामृत प"ाशता आरोग्या देणे
कथा श्रवणायोगे दु:खाते हरणे
दीन दुबळ्यांची मानून घे सेवा
हेचि विनिती तुला, जय सत्यदेवा।।
जयदेव जयदेव जय सत्यदेवा।।


- रचना : चिंतामणी केळकर आणि वाटवे बंधू

No comments: